छत्रपती संभाजीनगरात रंगला पॉलिटिकल ड्रामा!; एकनाथ शिंदे-अजित पवारांसोबत हे काय घडलं अन्‌ सत्तारांनी सावेंना का चूप बसवलं….

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरसाठी संडे हा पॉलिटिकल डे ठरला. राजकीय किस्से, टोलेबाजी, आरोप-प्रत्‍यारोपांनी दिवसभर राजकीय वातावरण गरम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कळून चुकलं, की देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय आली गाडी पुढेच जात नाही. मंत्री अब्‍दुल सत्तार यांनी मंत्री अतुल सावेंना शांत बसा म्‍हणत, गप्पही बसविण्याचा […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरसाठी संडे हा पॉलिटिकल डे ठरला. राजकीय किस्से, टोलेबाजी, आरोप-प्रत्‍यारोपांनी दिवसभर राजकीय वातावरण गरम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कळून चुकलं, की देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय आली गाडी पुढेच जात नाही. मंत्री अब्‍दुल सत्तार यांनी मंत्री अतुल सावेंना शांत बसा म्‍हणत, गप्पही बसविण्याचा किस्सा घडला… दिवसभर काय गंमतीजंमजी घडल्या हे वाचूया….

सत्तार अन्‌ सावेंत काय घडलं?
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून जिल्ह्यातील ८०० लाभार्थी यात्रेकरू रविवारी (६ ऑक्‍टोबर) सकाळी अकराला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकातून अयोध्येकडे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी रवाना झाले. या रेल्‍वेला पालकमंत्री अब्‍दुल सत्तार, मंत्री अतुल सावे, आ. विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, समाजकल्याणच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्‍याआधीची गोष्ट. अतुल सावे व आ. विक्रम काळे हे नियोजित वेळेवर रेल्वे स्टेशनवर आले. अतुल सावे मार्गदर्शन करत असताना अब्दुल सत्तार बोगीतील ज्येष्ठ प्रवाशांची भेट घेत होते. त्‍यामुळे माइकमधूनच सावे यांनी, पालकमंत्र्यांनी ताबडतोब इकडे यावे.

रेल्वे सुटायला फक्त ३ मिनिटे उरली आहेत…असे म्‍हणत बोलावले. त्यानंतर सत्तार यांनी माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात केली. तेव्हा सावे आणि आ. विक्रम काळे हे बोलत होते. त्यांना गप्पांत रंगलेले पाहून सत्तार यांनी ‘अरे तुम्ही शांत बसा…’ अशी सूचना केली. दरम्‍यान, यावेळी सत्तारांनी ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्यावर टीकास्‍त्र सोडले. राऊत यांना पवित्र करण्यासाठी, श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी विशेष रेल्वेने मुंबईहून अयोध्येला पाठवू, त्यांचे भाडेही आम्ही भरू, असा टोला त्‍यांनी लगावला. गुवाहाटीला गेलेल्या अनेक आमदारांना गुंगीचे औषध दिले गेले होते असा आरोप राऊत यांनी केल्याबद्दल पत्रकारांनी विचारल्यावर सत्तार यांनी हा टोला लगावला. सत्तार यांनी या वेळी ‘जय श्रीराम’ असा जयघोष केला.

देवेंद्र फडणवीसांशिवाय गाडी पुढे जाणारच नाही…
महिला व बालविकास खात्याने महिलांसाठी पिक ई रिक्षा योजना आणली आहे. योजनेच्या लाभार्थी नंदिनी आव्हाड, प्रीती काळे, उषा घोरपडे, कविता अंभोरे, चंचल थोरात आणि वैशाली गायकवाड यांना पिंक गुलाबी रिक्षाच्या चावीचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंक ई रिक्षात बसून ड्रायव्हिंग टेस्टसाठी निघाले. पण ती रिक्षा काही सुरू होईना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले व रिक्षात बसताच रिक्षा स्टार्ट झाल्याने देवेंद्र फडणवीसांशिवाय तुमची गाडी पुढे जाणारच नाही, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली. काहीच वेळ बसून अजित पवार रिक्षातून उतरल्याने त्याचाही संदर्भ आगामी राजकारणाशी जोडला गेला. महाविकास आघाडीच्या नेत्‍यांकडून तीनचाकी रिक्षाचे सरकार असे म्‍हणतात. त्यातील एखादे चाक कधीही पंक्चर होईल, असा टोला लगावतात. याची प्रचिती या कार्यक्रमात वारंवार आल्याचे चित्र हाेते.

उद्धव ठाकरेंना आव्हान…
छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. मुलाशी (खा. श्रीकांत शिंदे) का भिडता, बापाशी भिडा, अशा शब्दांत त्‍यांनी ठाकरेंना सुनावले. रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पूत्र खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना ‘मुख्यमंत्र्यांचं कारटं’ असा उल्लेख केला होता. त्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता शिंदे यांनी ठाकरेंवर शरसंधान साधले. ते म्हणाले, की हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला येते असे म्हटले जाते. ते हेच (ठाकरे) उदाहरण आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही, तर काम करून उत्तर देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते बिथरलेले आहेत, म्हणून तोंडाला येईल ते बोलत आहेत, असे शिंदे म्हणाले.

काँग्रेस OBC विभाग प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका…
लाडकी बहीण योजनेची ज्याप्रमाणे प्रसिद्धी केली जात आहे, तशी अदानी अंबानीसारख्या बड्या उद्योगपतींचे किती हजार कोटी कर्ज माफ केले याची प्रसिद्धी महायुती सरकार का करत नाही? या सरकारने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ९ लाख ७७ हजार कोटींचे कर्ज आपल्या राज्यावर करून ठेवले आहे, असा घणाघात काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले. रविवारी गांधी भवनमध्ये काँग्रेस ओबीसी विभागाच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक माळी यांनी घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश विभागाचे विजय राऊत, अशोक पगार, जगन्नाथ फुलारे, जिल्हाध्यक्ष अतिश पितळे, नारायण पारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software