मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा महाभाग नक्की आहे कोण?, नगरपरिषद म्‍हणते आमचे लोक नाहीत, मग हा भाई अवतरला कुठून?, पैठणमध्ये जनभावना संतप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील गोदावरी नदीकाठावरील मोक्ष घाटाच्या गेटवरच दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नातेवाइकांकडून अनधिकृतपणे चक्क १०० रुपयांची वसुली केली जात आहे. गोदावरी स्वच्छतेच्या नावाखाली ही पावती फाडली जात आहे. मात्र स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी आहेत, मग हे लोक कोण आहेत जे वसुली करत आहेत आणि कशासाठी करत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणीतरी […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील गोदावरी नदीकाठावरील मोक्ष घाटाच्या गेटवरच दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नातेवाइकांकडून अनधिकृतपणे चक्क १०० रुपयांची वसुली केली जात आहे. गोदावरी स्वच्छतेच्या नावाखाली ही पावती फाडली जात आहे. मात्र स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी आहेत, मग हे लोक कोण आहेत जे वसुली करत आहेत आणि कशासाठी करत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणीतरी भाई आहे, जो भाईगिरी करून अशाप्रकारे ‘खंडणी’ तीही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाऊन करत असल्याने पैठणमध्ये जनभावना संतप्त झाल्या आहेत.

नगरपरिषदेने अशाप्रकारे वसुली करण्याची परवानगी कुणालाही दिलेली नाही. याचे स्‍पष्टीकरण खुद्द मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. वसुलीवाले मात्र स्पष्टच सांगतात, की आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही. त्यांना तुम्ही कुणाच्या माध्यमातून व कधी स्वच्छता करता हे विचारल्यावर ते म्हणतात, काम चालूच आहे. नगर परिषदेकडून मोक्षघाटाच्या स्वच्छतेसाठी कोणतीही वसुली होती. त्यांनी स्वच्छता कर्मचारीही नियुक्त केले आहेत आणि ते स्वच्छताही करतात. मग ही वसुली कशासाठी, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्वच्छतेच्या नावाखाली पावती कोणत्या आधारे आणि कोणाच्या सांगण्यावरून दिली जात आहे, असा सवाल तर या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केली आहे.

लुटीची जणू परंपराच…
मोक्षघाटावर आधीच या ना त्‍या कारणावरून दशक्रिया विधीसाठी येणाऱ्यांकडून पैसे केले जातात. यात नगर परिषद पार्किंगसाठी लहान गाड्यांकडून २० रुपये तर मोठ्या गाड्यांकडून ३० रुपये घेते. परिसरात अवैध पार्किंगच्या नावाखाली शुल्‍क वसुलीही जोरात सुरू असते. त्‍यात आता गोदावरी नदीच्या स्वच्छतेच्या नावाखाली नगर जिल्ह्यातील एका भाईने ही भाईगिरी सुरू केली आहे. त्‍यामुळे लोक संतप्त झाले आहेत.

नगर परिषद काय म्हणते
नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे म्हणाले, की स्वच्छतेच्या नावाखाली कोण पैसे वसुली करत आहे, याची माहिती घेऊन तो प्रकार तातडीने थांबविण्यात येईल. मात्र आजवर झालेल्या वसुलीच्या रकमेचे काय, हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे. तूर्त हा मृताच्या टाळूवरचा लोणी खाण्याचा प्रकार बंद झाला तरी पुरेसे…

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software