Good News : नाथसागर @ ९०%; पालकमंत्री सत्तार यांनी केले जलपूजन!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील नाथसागर जलाशय ९० टक्के भरला असून, जलाशयाचे जलपूजन आज, २ सप्‍टेंबरला दुपारी राज्याचे पणन,अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलविसर्गाबाबत माहिती घेतली. काठावरील लोकांमध्ये आगाऊ सूचना देऊन खबरदारी बाळगण्याबाबत जनजागृती करण्याचे व आपत्ती व्यवस्थापन दलास […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील नाथसागर जलाशय ९० टक्के भरला असून, जलाशयाचे जलपूजन आज, २ सप्‍टेंबरला दुपारी राज्याचे पणन,अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलविसर्गाबाबत माहिती घेतली. काठावरील लोकांमध्ये आगाऊ सूचना देऊन खबरदारी बाळगण्याबाबत जनजागृती करण्याचे व आपत्ती व्यवस्थापन दलास सज्ज राहण्याचे निर्देशही दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, प्रांताधिकारी निलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंत प्रशांत जाधव, अधीक्षक अभियंता समाधान सबीनवार, उपविभागीय अभियंता रायबोले तसेच विलास भुमरे, किशोर अग्रवाल, रमेश पवार यांच्यासह जलसंपदा व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते जलसाठ्यास साडीचोळी, नारळ अर्पण करुन जलपूजन करण्यात आले. या वेळी माहिती देण्यात आली की, जायकवाडी धरणाचा पाणी साठा जवळपास ९० टक्के इतका झाला आहे. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढणार आहे. आवक विचारात घेऊन धरणामधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावात सतर्कता बाळगणे व संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे,असे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software