३ दिवसांपासून बेपत्ता सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाची तलावात आत्‍महत्‍या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने तलावात उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील चारू तांडा शिवारात सोमवारी (११ नोव्‍हेंबर) सकाळी अकराला समोर आली. तो तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. त्याच्या आत्महत्येचे कारण स्‍पष्ट झाले नाही. फर्दापूर पोलीस तपास करत आहेत. जितेंद्र मदन राठोड (वय २८, रा. नांदा तांडा, ता. सोयगाव) असे मृत्‍यू […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने तलावात उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील चारू तांडा शिवारात सोमवारी (११ नोव्‍हेंबर) सकाळी अकराला समोर आली. तो तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. त्याच्या आत्महत्येचे कारण स्‍पष्ट झाले नाही. फर्दापूर पोलीस तपास करत आहेत.

जितेंद्र मदन राठोड (वय २८, रा. नांदा तांडा, ता. सोयगाव) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. जितेंद्र चार महिन्यांपूर्वी बंगळुरू येथून गावाकडे आला होता. शेतातून जाऊन येतो असे सांगून शनिवारी (९ नोव्‍हेंबर) मोटारसायकलीने (क्र. एमएच २० एफव्ही ६५१७) घरातून बाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यानंतर त्‍याचा भाऊ विजय व ग्रामस्थांनी त्‍याचा परिसरात शोध घेतला. त्यानंतर विजयने रविवारी फर्दापूर पोलिसांत जितेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.

चारू तांडा शिवारात पोलिसांसह ग्रामस्थ त्‍याचा शोध घेत असताना सोमवारी सकाळी साठवण तलावाजवळ जितेंद्रची दुचाकी व चप्पल आढळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोध घेतला असता सकाळी अकराला जितेंद्रचा मृतदेह तलावात मिळून आला. सावळदबारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी फर्दापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोलीस जमादार मिरखा तडवी, शिवदास गोपाळ करीत आहेत. जितेंद्र बंगळुरू येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. नोकरी लागण्यापूर्वी शिक्षण घेण्यासाठी त्याने बारा लाख रुपयांचे खासगी व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी खासगी व्यक्तीकडून तगादा सुरू झाला होता. याच कारणावरून जितेंद्रने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केल्याचे जमादार मिरखा तडवी यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software