सोयगावचा अनोखा पारंपरिक सोहळा : सोनपावलांनी कानुबाईचे आगमन, घरोघरी उत्साहात स्थापना…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजऱ्या होणाऱ्या कानुबाई उत्सवाला सोयगाव तालुक्यात सायंकाळी सहाला प्रारंभ झाला आहे. रविवारी कानुबाईची पारंपरिक पद्धतीने विधिवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर आरती होऊन रोटाचा प्रसाद ग्रहण केला. कानुबाई स्थापनेची सोयगाव तालुक्यात रविवारी घरोघरी उत्साहात स्थापना करण्यात आली. खानदेशातील ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कानुबाई मातेचा सण सोयगाव तालुक्यात आनंदात […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजऱ्या होणाऱ्या कानुबाई उत्सवाला सोयगाव तालुक्यात सायंकाळी सहाला प्रारंभ झाला आहे. रविवारी कानुबाईची पारंपरिक पद्धतीने विधिवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर आरती होऊन रोटाचा प्रसाद ग्रहण केला. कानुबाई स्थापनेची सोयगाव तालुक्यात रविवारी घरोघरी उत्साहात स्थापना करण्यात आली.

खानदेशातील ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कानुबाई मातेचा सण सोयगाव तालुक्यात आनंदात साजरा केला जातो. रविवारी सायंकाळी कानुबाईचे आगमन झाले आहे. सोमवारी विसर्जन होत आहे. रविवारी सायंकाळी कानुबाई ही नारळाच्या रूपाने आणून तिची घरोघरी स्थापना केली. कुलपरंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो. कुलाचाराप्रमाणे सकाळी आदित्य उगतभानु (सूर्यनारायण) तर सायंकाळी कानुबाई रोट साजरे करतात. रोटसाठी आदल्यादिवशीच गहू कुलाचाराप्रमाणे मोजून दळून घेतले जातात. या कणकेला गव्हाच्या पिठास रोट असे म्हणतात. इष्टदेवतांसह घरातील सदस्यांची संख्या अशी प्रत्येकांची पाच मूठ गहू दळण्यासाठी घेतात. प्रत्येक ठिकाणी पद्धत निरनिराळी आहे. रोटांची कणिक काही दिवसाच्या आत संपवायची असते, अशी परंपरा आहे.

अशी केली स्थापना…
केळीच्या खांबाने मखर सुशोभित करून चौरंगावर तांब्याच्या कलशात सुपारी पैसे (नाणे) टाकून व सजवून त्यावर पारंपरिक नारळ ठेवून देवीचा श्रृंगार केला जातो. अलंकारांनी सजवून देवीला फुले अर्पण केली जातात. त्यानंतर सायंकाळी महानैवेद्य अर्पण केला जातो. रोटपोळी, गंगाफळाची भाजी, खीर व पुरणपोळी असा नैवेद्य कानबाई अर्पण केला जातो. साखर फुटाणे लाह्या या प्रसादाला महत्त्व आहे. कानुबाई मातेची उत्साहात स्थापना झाल्यावर कुटुंबातील सदस्य व परिसरातील पुरुष, महिला रात्रभर अहिराणी भाषेतील गाणी व भक्त्तिगीते सादर करतात.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...

Latest News

एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात... एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
भारतात सरकारी नोकऱ्यांची मोठी क्रेझ आहे. लाखो तरुण एमपीएससी, यूपीएससी, बँका, पोलीस, शिक्षक, रेल्वे इत्यादींमध्ये भरतीसाठी तयारी करतात. देशात सरकारी...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
धक्कादायक : इंग्रजी शाळेत सहावीतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software