वाळूमाफियाच्या त्रासाला कंटाळून ४५ वर्षीय व्यक्‍तीची आत्‍महत्‍या, वैजापूरमध्ये खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूमाफियाच्या त्रासाला कंटाळून नागमठाण (ता. वैजापूर) येथे ४५ वर्षीय व्यक्‍तीने राहत्‍या घरात पत्र्याच्या शेडला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (६ ऑक्‍टोबर) पहाटे चारच्या सुमारास समोर आली. हरिभाऊ कडू राशीनकर (वय ४५) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. हरिभाऊंच्या मुलाविरुद्ध वाळूचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा खोटा असून, एका […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूमाफियाच्या त्रासाला कंटाळून नागमठाण (ता. वैजापूर) येथे ४५ वर्षीय व्यक्‍तीने राहत्‍या घरात पत्र्याच्या शेडला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (६ ऑक्‍टोबर) पहाटे चारच्या सुमारास समोर आली. हरिभाऊ कडू राशीनकर (वय ४५) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे.

हरिभाऊंच्या मुलाविरुद्ध वाळूचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा खोटा असून, एका वाळूमाफियाच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचे राशीनकर यांचे म्‍हणणे होते. काही दिवसांपासून वाळूमाफिया त्रास देत असल्यानेही ते त्रस्‍त झाले होते. आत्महत्येपूर्वी राशीनकर यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांकडे दिल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यातही वाळूमाफियाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद आहे, असे नातेवाइकांनी सांगितले. विरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software