- News
- जिल्हा न्यूज
- लासूर स्टेशन बाजार समिती बरखास्त होणार की तरणार?; दावे-प्रतिदाव्यांनी गंगापूरचे राजकारण तापले!
लासूर स्टेशन बाजार समिती बरखास्त होणार की तरणार?; दावे-प्रतिदाव्यांनी गंगापूरचे राजकारण तापले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
शिल्लेगाव, ता. गंगापूर (तुषार नरोडे) : लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरून सध्या गंगापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. न्यायालयाचा निर्णय काय येईल, याबद्दल उत्सुकता असताना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी शनिवारी (३१ ऑगस्ट) स्वतःच न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून ८ दिवसांत पणनमंत्र्यांना बाजार समिती बरखास्त करावी लागेल, असे सूतोवाच केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त […]
शिल्लेगाव, ता. गंगापूर (तुषार नरोडे) : लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरून सध्या गंगापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. न्यायालयाचा निर्णय काय येईल, याबद्दल उत्सुकता असताना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी शनिवारी (३१ ऑगस्ट) स्वतःच न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून ८ दिवसांत पणनमंत्र्यांना बाजार समिती बरखास्त करावी लागेल, असे सूतोवाच केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच, विद्यमान सभापती शेषराव जाधव यांनी मात्र आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आ. प्रशांत बंब व आ. रमेश बोरणारे यांच्या पॅनलचे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व आहे. खुलताबाद बाजार समिती लासूर स्टेशन बाजार समितीत विलीनीकरणाचा अध्यादेश वर्षभरापूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी काढला होता. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. मात्र पणनमंत्र्यांनी संचालक मंडळाच्या बरखास्तीला स्थगिती दिली. त्यावर ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोणगावकर हे उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने पणनमंत्र्यांना निर्णय घेण्याचे सांगितल्याने आठ दिवसांत बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त होणार, असा दावा कृष्णा पाटील डोणगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. न्यायालयाचा अंतिम निर्णय आला नसताना कृष्णा पाटलांनी स्वतःच न्यायाधीश होत केलेल्या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कृष्णा पाटलांच्या पत्रकार परिषदेनंतर बाजार समिती सभापती शेषराव जाधव यांनीही पत्रकार परिषद घेऊन कृष्णा पाटलांचे दावे खोडून काढले. ते म्हणाले, की बाजार समिती आमच्या ताब्यात आली तेव्हा बँक खात्यात ८ हजार रुपये होते. आम्ही एकदिलाने काम करून आजचे बॅलन्स कोटीमध्ये पोहोचवले आहे. वर्षभरातच बाजार समितीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली. विरोधक राजकीय उद्देशाने विरोध करत आहेत. आम्हाला न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य राहील. परंतु आम्ही आमचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
By City News Desk
गोरक्षकांनी केंब्रीज चौकात पकडला गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...
By City News Desk
राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!
By City News Desk
Latest News
07 Dec 2025 18:47:06
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...

