- Marathi News
- जिल्हा न्यूज
- दानवेंवर टीका करण्याच्या नादात सत्तारांचे एकनाथ शिंदेंनाच आव्हान!; म्हणाले, माझ्यात मुख्यमंत्री बदल...
दानवेंवर टीका करण्याच्या नादात सत्तारांचे एकनाथ शिंदेंनाच आव्हान!; म्हणाले, माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद!!
On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सत्तार यांनी अजिंठा येथील पुन्हा एकदा दानवे यांच्यावर शरसंधान साधले. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, […]
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सत्तार यांनी अजिंठा येथील पुन्हा एकदा दानवे यांच्यावर शरसंधान साधले. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, यावरून भाजप सावध भूमिका घेत असताना शिंदे गटाच्याच आमदाराने मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचे म्हटल्याने या टिकेची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कन्नड येथील सभेलाही सत्तार आले नव्हते, हे विशेष.
अजिंठा येथील जाहीर सभेत सत्तार म्हणाले, की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते खालच्या पातळीवर येऊन जातीपातीवर मते मागत आहेत. मुख्यमंत्री बदलण्याची ताकद माझ्यात आहे. हे चणे चरपटे माझा काय मुकाबला करतील, असे वक्तव्य त्यांनी केले. आजवर माझे चॉकलेट व बिर्याणी दानवे यांना गोड लागत होती. जनतेने त्यांना जागा दाखवली तर, झोपेतही त्यांना मीच दिसतो. दानवे निवडून येत होते तेव्हा सिल्लोड हा पाकिस्तान नव्हता. आता पराभूत झाल्यावर त्यांना सिल्लोड म्हणजे पाकिस्तान वाटत आहे, असे ते म्हणाले. ज्यांनी ग्रामपंचायत निवडणूक कधी जिंकली नाही असे काही अपक्ष माझ्यासमोर निवडणूक लढत आहेत. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. कोण कुणाची मते खाण्यासाठी उभे आहे, हे जनतेला माहीत आहे, असे सत्तार म्हणाले. सत्तार यांच्या वक्तव्याचे वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
By City News Desk
पैठण येथून युवक बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटजवळ जुगार अड्ड्यावर छापा, ६ जुगारी पकडले
By City News Desk
Latest News
12 Nov 2025 20:31:11
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
