- News
- जिल्हा न्यूज
- दानवेंवर टीका करण्याच्या नादात सत्तारांचे एकनाथ शिंदेंनाच आव्हान!; म्हणाले, माझ्यात मुख्यमंत्री बदल...
दानवेंवर टीका करण्याच्या नादात सत्तारांचे एकनाथ शिंदेंनाच आव्हान!; म्हणाले, माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सत्तार यांनी अजिंठा येथील पुन्हा एकदा दानवे यांच्यावर शरसंधान साधले. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, […]
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सत्तार यांनी अजिंठा येथील पुन्हा एकदा दानवे यांच्यावर शरसंधान साधले. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, यावरून भाजप सावध भूमिका घेत असताना शिंदे गटाच्याच आमदाराने मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचे म्हटल्याने या टिकेची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कन्नड येथील सभेलाही सत्तार आले नव्हते, हे विशेष.
अजिंठा येथील जाहीर सभेत सत्तार म्हणाले, की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते खालच्या पातळीवर येऊन जातीपातीवर मते मागत आहेत. मुख्यमंत्री बदलण्याची ताकद माझ्यात आहे. हे चणे चरपटे माझा काय मुकाबला करतील, असे वक्तव्य त्यांनी केले. आजवर माझे चॉकलेट व बिर्याणी दानवे यांना गोड लागत होती. जनतेने त्यांना जागा दाखवली तर, झोपेतही त्यांना मीच दिसतो. दानवे निवडून येत होते तेव्हा सिल्लोड हा पाकिस्तान नव्हता. आता पराभूत झाल्यावर त्यांना सिल्लोड म्हणजे पाकिस्तान वाटत आहे, असे ते म्हणाले. ज्यांनी ग्रामपंचायत निवडणूक कधी जिंकली नाही असे काही अपक्ष माझ्यासमोर निवडणूक लढत आहेत. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. कोण कुणाची मते खाण्यासाठी उभे आहे, हे जनतेला माहीत आहे, असे सत्तार म्हणाले. सत्तार यांच्या वक्तव्याचे वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
गोरक्षकांनी केंब्रीज चौकात पकडला गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...
By City News Desk
राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!
By City News Desk
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
By City News Desk
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
Latest News
07 Dec 2025 16:01:32
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १६ वर्षांची मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा, दोघेही अल्पवयीन, मुलगी गरीब, मुलगा सधन कुटुंबातील......

