फायलींचा गतिमान प्रवास, तक्रारींचा निपटाराही जलद; छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या जादूवर भाळले राज्य सरकार; म्हणाले, राज्यभर असेच काम झाले पाहिजे!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासनातील महत्वाचे पद. ते बळकट केले तर प्रशासन गतीने पळते, हे ओळखून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तसे बदल केले आणि जादू झाली. फायलींचा गतिमान प्रवास झाला. तक्रारींचा निपटाराही जलद होऊ लागला. आता राज्य सरकारने अगदी अशीच कार्यपद्धती राज्यभर लागू करण्यासाठीचे आदेश काढले आहेत. शासनाच्या या आदेशामुळे जिल्हाधिकारी स्वामी यांच्या कौशल्यपूर्ण कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्याचे प्रशासन गतिमय करण्याच्या हेतूने १५ मे २०२५ रोजी पत्र काढून सर्वांना प्रशिक्षित केले. प्रशासनाच्या कामात गतिमानता आणि पारदर्शकता आणणे, समन्वय वाढवणे आणि उत्तरदायित्व वाढवणे हा त्यामागील उद्देश होता. यात त्यांनी महत्वाचे म्हणजे मंडळ अधिकारी हे पद अधिक मजबूत केले. त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात आणले. अधिकार आणि कर्तव्ये यांची त्यांना जाणीव करून दिली. यामुळे तलाठी आणि तहसीलदार यांच्यातील दुवा असलेले हे पद मजबूत झाले. परिणामत: जमिनींचे फेरफार यासह महसूलमधील सर्वच कामे तातडीने होऊ लागली. कामे लवकर व्हायला लागल्याने लोकही खुश झाले. 

जिल्हाधिकारी स्वामी यांच्या या आदेशाचा परिणाम म्हणजे प्रशासन गतिमान झाले. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या या गतिमान कार्यपद्धतीची राज्यभर चर्चा सुरू झाली. अखेर राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा हा गतिमान पॅटर्न राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या महसूल आणि वन विभागाने १० ऑक्टोबरला तसे पत्रच काढून छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे राज्यभरातील महसूल प्रशासकांना बजावले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महसूल प्रशासनाची आदर्श कार्यपद्धती राज्यभर लागू होत असल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

काय आहे अध्यादेश
-सज्जा चावडीमध्ये ग्राम मसुल अधिकारी आणि मंडळ कार्यालयातील उपस्थिती व कामकाजाच्या वेळेबाबत यापुढे मंडळ अधिकारी पर्यवेक्षण करतील.
-राज्यातील सर्व जिल्हाधिकारी अध्यदेशातील सर्व सुचनांनुसार आढावा घेतील.
-जिल्हाधिकारी सर्व मंडळ कार्यालयांना तातडीने आपले सरकार केंद्र मंजूर करतील.
-मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयातील उपस्थितीचे दिवस निश्चित केले जातील. 

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले... 
महसूल सहायक, मंडळ अधिकारी यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठे अधिकार असतात. त्यांनी जनतेला न्याय द्यावा, प्रशासनात सुधारणा व्हावी या हेतूने पत्र काढून काही सूचना दिल्या होत्या. त्यांचा सकारात्मक परिणाम झाला. लोकांना न्याय जलद मिळायला लागला. आता राज्य सरकारने हीच कार्यपद्धती स्वीकारली, याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software