मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी ५२ हजार कोटींची तरतूद : उद्योगमंत्री उदय सामंत यांची छत्रपती संभाजीनगरात माहिती

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि मराठवाड्यात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरिव तरतूद केली असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज, २९ सप्‍टेंबरला छत्रपती संभाजीनगरात केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागामार्फत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि मराठवाड्यात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरिव तरतूद केली असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज, २९ सप्‍टेंबरला छत्रपती संभाजीनगरात केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमास पालकमंत्री तथा अल्पसंख्यांक आकौफ मंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, जालन्‍याचे खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, उद्योग विभागाचे प्रकल्प संचालक मलिक नेर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संभाजीनगरचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, उद्योग विभागाचे उपसंचालक बी. टी. यशवंते यांच्यासह उद्योग विभागातील मराठवाड्यातील सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी, कर्मचारी विविध योजनांचे लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, की औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उद्योजकांना निर्भय आणि विश्वासपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्याबरोबरच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरक्षा देण्यात देण्यात येईल. उद्योगांच्या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासाठी केलेले काम हे उल्लेखनीय असून उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये लुब्रिझॉल, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, किर्लोस्कर टोयाटो या प्रकल्पांना कार्यरत करण्यात आले. शासन, जनता आणि उद्योजक यावरील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी उद्योगाच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून, शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम शासनाने केले असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, की उद्योगाच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन उद्योजकांच्या पाठीशी असून त्यांच्या निर्भय वातावरण देण्याबरोबरच विकासासाठी आवश्यक असणारे काम शासन करीत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software