मतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी पोहोचले विद्यार्थ्यांपर्यंत!; दिला हा मोलाचा सल्ला!!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपल्या आयुष्यात व सामाजिक जीवनात मिळणाऱ्या विविध सोयीसुविधा, शिक्षण, रोजगार यांसारख्या बाबी प्राप्त करण्यात तसेच आपल्याला मिळालेले अधिकार आणि कर्तव्य हे सगळे लोकशाहीमुळे मिळालेले आहे. त्यासंदर्भात युवकांनी जागरुक असावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. विधानसभेच्या १०७- छत्रपती संभाजीनगर (मध्य) मतदारसंघांतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपल्या आयुष्यात व सामाजिक जीवनात मिळणाऱ्या विविध सोयीसुविधा, शिक्षण, रोजगार यांसारख्या बाबी प्राप्त करण्यात तसेच आपल्याला मिळालेले अधिकार आणि कर्तव्य हे सगळे लोकशाहीमुळे मिळालेले आहे. त्यासंदर्भात युवकांनी जागरुक असावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

विधानसभेच्या १०७- छत्रपती संभाजीनगर (मध्य) मतदारसंघांतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. त्‍यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. प्रभा खैरे, डॉ. विनोद मुंदडा, आयएमएच्या डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. श्रीनिवास गडाफ, डॉ. सुरेश सारवडे, स्वीप अधिकारी संजीव सोनार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की विद्यार्थी जीवनात विद्यार्जन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनासाठी आपल्या समाजासाठी लोकशाहीचे संवर्धन आणि जतन करणे हे सुद्धा आपले आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदान करणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी युवकांनी जागरूक असायला हवे.

विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या भवतालच्या सार्वजनिक प्रश्नात लक्ष घालून पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, वृक्षरोपण अशा विविध विषयांत विद्यार्थ्यांनी कार्यरत असणे आवश्यक आहे. आपल्या आई वडील, गुरुजनांचा आदर करणे, सुसंस्कारित होणे यासारख्या बाबी या व्यक्तिमत्व विकासाला पूरक असतात. या संस्कारांपासून दूर जाणाऱ्या पिढीला संस्कारक्षम बनवून देश, राज्य आणि समाजाभिमुख युवक घडविणे हे आजच्या शिक्षक आणि पालकांचे उद्दिष्ट असायला हवे, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. अर्चना दरे यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...

Latest News

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही... छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्‍टोबरपासून...
सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शिवीगाळीचा भडीमार, पोलिसांनी २३ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
लई हुशारी केली, पण शेवटी घडा भरलाच!; ‘कायद्या’चा गैरवापर करून लाखो रुपये उकळले, अखेर दुकलीला आता पडल्या बेड्या!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी, नक्की काय आहे स्टोरी वाचूया... 
मंजूरपुऱ्यातील ‘बॉस पब्लीक चॉईस’ रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडले, चोरट्यांनी शर्ट-पँट नेले...
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software