निवडणुकीत आचारसंहिता भंग होतेय? छत्रपती संभाजीनगरवासियांनो केवळ बघू नका, कर्तव्य पार पाडा, थेट इथे तक्रार करा..!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजील मोबाईल ॲपवर किंवा १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची तत्‍काळ दखल घेऊन क्षेत्रीय पथकाद्वारे तक्रारीची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजील मोबाईल ॲपवर किंवा १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

नागरिकांनी केलेल्या तक्रारीची तत्‍काळ दखल घेऊन क्षेत्रीय पथकाद्वारे तक्रारीची शहनिशा केली जाते. तक्रार १०० मिनिटांत निकाली काढण्‍यात येते. त्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहायही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बंदूक, पिस्‍तूल प्रदर्शन करणे, दारू वाटप, पैसे वाटप, सरकारी मालमत्‍तेचे विद्रूपण, मतदारांची वाहतूक, भेटवस्‍तू वाटप, पेड न्यूज, जातीत तेढ निर्माण करणारे भाषण, धमकी आदी प्रकार होत असल्‍याचे निदर्शनास आल्यास नागरिक अशा घटनांचे cVIGIL ॲपद्वारे फोटो, व्हिडीओ तसेच ऑडिओ रेकॉर्ड करून ऑनलाईन तक्रारी दाखल करू शकतात. नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software