जिल्ह्यात थांबवले ९५ बालविवाह!; ४ मुलींना ठेवले बालगृहात!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात आतापर्यंत ९५ बालविवाह थांबविण्यात आले असून ४ प्रकरणांमध्ये मुलींना बालगृहात ठेवण्यात आले असू उर्वरित प्रकरणात पालकांचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीतून समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (२५ मे)घेतला. बालकामगार, बाल विवाह, बाल भिक्षेकरी, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात आतापर्यंत ९५ बालविवाह थांबविण्यात आले असून ४ प्रकरणांमध्ये मुलींना बालगृहात ठेवण्यात आले असू उर्वरित प्रकरणात पालकांचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीतून समोर आली आहे.

महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (२५ मे)घेतला. बालकामगार, बाल विवाह, बाल भिक्षेकरी, बाल मृत्यू सारख्या बालकांशी निगडीत सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी सर्व संबंधित विभागांनी मिळून कालबद्ध कार्यक्रम राबवावा व या समस्यांचे निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला.

बैठकीला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष श्रीमती आशा शेरखाने, बाल न्याय मंडळ अध्यक्ष एस. एस. जाधव, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, मनपा अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) पी. एम. शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती आर. एन. चिंद्रे, श्रीमती सुवर्णा जाधव, परिविक्षा अधिकारी व्ही. बी. विघ्ने तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

कोविडमुळे पालक गमावलेले बालक, बाल भिक्षेकरी, बाल कामगार, मानवी हक्क, अनाथ प्रमाणपत्र, प्रायोजकत्व, प्रतिपालकत्व, चाईल्ड हेल्प लाईन, बाल न्याय मंडळ, जिल्हा पुनर्वसन समिती, जिल्हा परिविक्षा समिती आदीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात कोविड मुळे दोन पालक दगावलेल्या बालकांची संख्या २७ असून त्या बालकांना राज्य शासनाकडून प्रति बालक ५ लाख रुपये याप्रमाणे दिले जाणारे मुदत ठेवीचे अर्थसहाय्य बालकांच्या संयुक्त बँक खात्यात ठेवण्यात आले आहेत. त्याचे मुदतठेव प्रमाणपत्रही वितरीत झाले आहे.

केंद्र शासनाकडून पोस्टात मुदतठेव ठेवण्यात आली असून प्रति बालक ५५०० रुपये वयाच्या १८ व्या वर्षांनंतर जमा होतात. याशिवाय बाल न्यायनिधी अंतर्गत प्रति बालक १० हजार रुपये, बालकांची मालमत्ता हक्क संरक्षित करणे याबाबतही माहिती सादर करण्यात आली. प्रायोजकत्व योजनेअंतर्गत प्रतिबालक प्रति महिना चार हजार रुपये लाभ दिला जातो. आतापर्यंत ७१६ बालके या योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्हा बालसंरक्षण कक्षाअंतर्गत जिल्ह्यात १७ बालगृहे, २ शिशुगृहे, प्रत्येकी एक निरीक्षण व एक अनुरक्षण गृह अशा एकूण २१ संस्था असून त्यात १६१७ बालकांची संगोपन व्यवस्था क्षमता आहे. तेथे ३३४ बालके सध्या प्रवेशित आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software