करवसुलीत अपयशी ठरलेल्या महापालिकेची चिमुकल्यांवर वक्रदृष्टी!; महिन्याला १ हजार रुपये वसूल करण्याची रझाकारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : करवसुलीत बोंबाबोंब असलेल्या महापालिकेने हे अपयश लपवत दुसरीकडे विद्यार्थ्यांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. महापालिकेच्या सीबीएसई शाळांतील विद्यार्थ्यांकडून महिन्याला १ हजार रुपये शुल्क वसुलीचा घाट रचला असून, या रझाकारीविरुद्ध पालक एकवटले आहेत. शुक्रवारी (५ जुलै) पालकांनी एकत्र येऊन महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. महापालिका आयुक्त दया करा, दया करा… प्रवेश शुल्क वाढ रद्द […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : करवसुलीत बोंबाबोंब असलेल्या महापालिकेने हे अपयश लपवत दुसरीकडे विद्यार्थ्यांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. महापालिकेच्या सीबीएसई शाळांतील विद्यार्थ्यांकडून महिन्याला १ हजार रुपये शुल्क वसुलीचा घाट रचला असून, या रझाकारीविरुद्ध पालक एकवटले आहेत. शुक्रवारी (५ जुलै) पालकांनी एकत्र येऊन महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. महापालिका आयुक्त दया करा, दया करा… प्रवेश शुल्क वाढ रद्द करून दया करा… अशा घोषणा पालकांनी दिला. तब्बल तीन तास प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला.

महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीबीएसई माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्‍हणून पालकांनी गर्दी केली होती. यंदाचे प्रवेशही फुल झाले आहेत. एकीकडे शासन गोरगरीबांना शिक्षण मोफत असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे मात्र त्‍याच सरकारचा भाग असलेल्या महापालिकेने मनमानी चालवली आहे. प्रशासकांनी विद्यार्थ्याकडून महिन्याला १ हजार रुपये वसुलीचा फतवा काढल्याने पालक संतप्त झाले आहेत. सुरुवातीला या शाळेत मोफत शिक्षण असल्याचे सांगण्यात आले होते. त्‍यानंतर अचानक हे शुल्क लादले आहे, जे अन्यायकारक असल्याचे पालकांचे म्‍हणणे आहे.

या शाळांमध्ये सफाई कामगार, मजूर, कंपनी कामगार तसेच मोलमजुरी करणाऱ्या पालकांची मुले शिक्षण घेत आहेत. त्‍यामुळे हा मनमानी निर्णय रद्द करण्याची मागणी होत आहे. पालकांनी महापालिकेसमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची वाहने गेटबाहेर काढताना सुरक्षारक्षकांची दमछाक झाल्याचे शुक्रवारी पहायला मिळाले. दरम्यान, ही शुल्क वाढ मागे घेण्यास मनपा प्रशासकांनी आधीच नकार दिला आहे, हे विशेष. त्‍यामुळे आता सरकारनेच आता प्रशासकांचे कान टोचण्याची गरज निर्माण झाल्याचा संताप पालकांनी व्यक्‍त केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software