ऊसतोडीला येतो म्हणून ९ लाख घेतले, पैसे परत करण्याची वेळ आली तर... मुकादम संजय राठोड यांची खून की आत्‍महत्‍या?, छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऊसतोडीला येतो असे सांगून ९ लाख रुपये घेतल्यानंतर तिन्ही कामगार उलटले. आम्ही येणार नाही, पैसेही देणार नाही, असे सांगून टाकले. पैशांसाठी मुकादम मागे लागल्याने त्याला पैसे परत करतो, असे म्‍हणून सोबत नेले. त्‍यानंतर मुकादमाचा संशयास्पद मृत्‍यू झाला आहे. चिकलठाणा पोलिसांनी आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोमवारी (६ ऑक्‍टोबर) दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील परदरी तांडा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली.

सुनिता संजय राठोड (वय ३५, रा. पिपरखेडा ता. अंबड जि. जालना) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती संजय राठोड (वय ४५) व मुलासह राहतात. शेती व उसतोडीचे काम करून उदरनिर्वाह करतात. या वर्षी सुनिता यांचे मामेसासरे आण्णासाहेब लक्ष्मण राठोड (रा. राहुवाडी तांडा ता. अंबड जि. जालना) आणि संजय राठोड यांनी मिळून मुकादमचे काम करण्याचे ठरवले. मूळ गावी परदरी तांडा या ठिकाणी ३ उसतोडीच्या गाड्या मिळणार असल्याने संजय लक्ष्मण चव्हाण, वनसिंग हेमा राठोड, संजू लोभा चव्हाण (सर्व रा. परदरी तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांना १५ जुलै २०२५ रोजी नोटरी करारनामा व बॉन्ड करून प्रत्येकी ३ लाख रुपयांप्रमाणे ९ लाख रुपये संजय राठोड व अण्णासाहेब राठोड यांनी दिले होते.

काही दिवसांनी वनसिंग हेमा राठोड याने कॉल करून सांगितले की, आम्ही ऊस तोडीला येणार नाही आणि पैसे पण देणार नाही. त्यामुळे संजय राठोड हे त्यांना भेटायला परदरी तांडा येथे गेले. त्यावेळी तिघांनी तुमचे पैसे परत देतो, असे सांगितले. मात्र पैसे परत केले नाहीत. नातेवाइकांकडून पैसे घेतलेले असल्याने संजय राठोड यांनी कमी भावात त्यांची बागायत जमीन गावातील प्रल्हाद सोमा आडे यांना विकली. त्या पैशांतून उसनवार घेतलेले पैसे देऊन टाकले. मात्र फसवणुकीच्या प्रकारामुळे ते तणावात राहू लागले.

खून की आत्महत्या?
संजय राठोड आणि त्‍यांचे मोठे भाऊ विजय फुलसिंग राठोड हे राहुवाडी (ता. अंबड) येथे गेले होते. तेथे जेवण करून बसलेले असताना पैसे घेऊन फसवणूक करणारे संजय लक्ष्मण चव्हाण, वनसिंग हेमा राठोड, संजू लोभा चव्हाण व एक अनोळखी (सर्व रा. परदरी तांडा ता. छत्रपती संभाजीनगर) हे आले. त्यांनी आम्ही घेतलेले पैसे परत देतो. आमच्यासोबत चल, असे सांगून संजय राठोड यांना परदरी तांडा येथे नेले. त्यानंतर ११ सप्‍टेंबरला संध्याकाळी ७ वाजता संजयचे भाऊ विजयने सुनिता राठोड यांना कॉल करून सांगितले, की संजयचे दुखत असून, त्याला घाटी रुग्णालयात आणले आहे.

सुनिता यांनी छत्रपती संभाजीनगरात येऊन घाटी रुग्णालय गाठले. तेव्हा डॉक्टरांकडून कळले, की संजय यांनी काहीतरी विषारी औषध पिल्याने मृत झाले आहेत. त्‍यांच्या मृत्‍यूला पैसे घेऊन फसवणारे संजय लक्ष्मण चव्हाण, वनसिंग हेमा राठोड, संजू लोभा चव्हाण हेच जबाबदार असल्याचे तक्रारीत सुनिता यांनी म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांनी सोबत नेल्यानंतरच संजय राठोड यांचा मृत्‍यू झाल्याने याप्रकरणात काळेबेरे असण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. ही हत्‍या आहे की आत्‍महत्‍याचा याचा सखोल तपास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software