EXCLUSIVE : तृतीयपंथीयांवर पोलीस आयुक्‍तांची वक्रदृष्टी; नव्या आदेशाने केली कोंडी!, ‘काहीं’च्या विचित्र-बिभत्‍स वागणुकीचा ‘सर्वांना’च फटका, शहरात इतके आहेत तृतीयपंथी…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील काही तृतीयपंथीयांनी नागरिकांना पैशांसाठी वेठीस धरल्याच्या घटना पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी अत्‍यंत गांभीर्याने घेतल्या असून, चोहोबाजूंनी अशा तृतीयपंथीयांची नाकेबंदी केली आहे. मात्र याचा परिणाम सर्वच तृतीयपंथीयांवर झाला असून, काहींमुळे सर्वांनाच दोषी ठरवू नका, आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती तृतीयपंथीयांनी व्यक्‍त केली आहे. आम्हाला कुणी नोकरी दिली […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील काही तृतीयपंथीयांनी नागरिकांना पैशांसाठी वेठीस धरल्याच्या घटना पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी अत्‍यंत गांभीर्याने घेतल्या असून, चोहोबाजूंनी अशा तृतीयपंथीयांची नाकेबंदी केली आहे. मात्र याचा परिणाम सर्वच तृतीयपंथीयांवर झाला असून, काहींमुळे सर्वांनाच दोषी ठरवू नका, आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती तृतीयपंथीयांनी व्यक्‍त केली आहे. आम्हाला कुणी नोकरी दिली असती तर आम्हीच कुणाला पैसे मागितले नसते, असे सांगत तृतीयपंथीयांनी नागरिक स्वेच्छेने जेवढे देतील तेवढेच बहुतांश तृतीयपंथी घेतात. काही तृतीयपंथीयांच्या किंवा बनावट तृतीयपंथीयांच्या अतिरेकीपणामुळे सर्वांनाच जबाबदार धरू नका, असे म्‍हटले आहे.

पोलीस आयुक्‍तांनी काढले आदेश….
आता एकट्याने, समूहाने फिरून शहरात कुठल्याच भागात आस्थापना, लग्न, उत्सवात तृतीयपंथीयांना पैसे मागण्यासाठी जाता येणार नाही. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी याबाबत आदेश जारी केले. हे आदेश ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबरपर्यंत तृतीयपंथीयांसाठी लागू असतील. आक्षेपार्ह इशारे, स्पर्श करून पैशांची मागणी करणाऱ्या सहा तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी अशा अतिरेकी तृतीयपंथीयांविरुद्धचा फास आवळला आहे. चौकात बंदी घातल्यानंतर काही तृतीयपंथी शोरूमध्ये शिरले. नवे वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना हेरू लागले.

मोंढा, बाजारपेठ, लग्न, मुंज, वास्तुशांती आदी कार्यक्रमांमध्ये जाऊन पैशांसाठी दादागिरी करू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्‍यामुळे पोलीस आयुक्‍तांनी आता थेट आदेशच काढला आहे. उपद्रव किंवा जनतेला धोका निर्माण होण्यापासून रोखण्याच्या हेतूने पोलीस आयुक्तांना असे आदेश काढण्याचे अधिकार आहेत. भीक मागणारे, तृतीयपंथीयांनी एकट्याने, समूहाने फिरण्यास, निवासस्थान, आस्थापने, सार्वजनिक ठिकाणी भेट देण्यास मनाई केली आहे. कुटूंबातील जन्म, मृत्यू, लग्न किंवा उत्सवात भेट देण्यासही मनाई असेल. चौक, रस्त्यावरही नागरिकांकडून पैसे घेण्यास सक्त मनाई असेल. दोन दिवसांपूर्वी जिन्सी आणि सिडको पोलिसांनी सेव्हन हील आणि लेमन ट्री चौकात ६ तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

तृतीयपंथीयांना नोकरीचे काय?
गेल्या वर्षी स्मार्ट सिटी प्रशासनाने तृतीयपंथीयांना नोकरी देण्याचा विचार केला होता. यात काहीच दिवस केवळ चार तृतीयपंथीयांनीच काम केले. त्यांचे शिक्षण अपूर्ण असणे, कामाची जाण नसणे तसेच मुख्यत्वे सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची वागणूक यामुळे त्‍यांना काम सोडावे लागले. तृतीयपंथीयांना खासगी क्षेत्रातही काम करण्याची कुणी संधी देत नाही. ते साफसफाईचे कामही करायला तयार आहेत. मात्र लोकांची मानसिकता त्यांना काम देण्याची नाही.

कुठे राहतात तृतीयपंथी?
शहरात सध्या १ हजारांहून अधिक तृतीयपंथी आहेत. ते गारखेडा, शिवाजीनगर, खडकेश्वर परिसर, मोंढा नाका भागात समूहाने राहतात. विशेष म्‍हणजे काही बनावट तृतीयपंथीही निर्माण झाले असून महिलेचा पेहराव करून ते लोकांना पैशांसाठी त्रास देत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. जी खरी तृतीयपंथी असते ती अशी वाईट कधीच वागत नाही. कारण तिने लहानपणापासून दुजाभावाची वागणूक सहन केलेली असते. ती अशी उद्धट वागत नाही. कारण त्‍यांच्याच मनात एक भीती असते, असे तृतीयपंथीयांनी सांगितले. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड म्हणाल्या, की पोलिस आयुक्तांचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे. मात्र तृतीयपंथीयांच्या उदरनिर्वाहासाठीही प्रशासनाने पुढाकार घ्यावा. साफसफाईसारख्या कामांत तृतीयपंथीयांचा समावेश केला तरी चालेल. माणुसकीनेही त्‍यांच्याकडे पाहिले पाहिजेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software