आधी गंडा घातला, मग मानसिक छळ केला : ३२ वर्षीय महिलेची आत्‍महत्‍या, दोन भावांना अटक, हर्सूलच्या पोलीस कॉलनीतील प्रकरण...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : हर्सूलच्या पोलीस कॉलनीतील ३२ वर्षीय महिलेच्या आत्‍महत्‍येप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. व्यवसायात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून पैशांसह सोने उकळून त्यांनी महिलेची फसवणूक केल्याने ती तणावाखाली गेली होती. यातूनच तिने विष पिले होते.

मनिषा संजय पांडे असे आत्‍महत्‍या केलेल्या महिलेचे नाव असून, मंगळवारी (७ ऑक्‍टोबर) मध्यरात्री त्यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ती १९ सप्‍टेंबरला विष पिल्यापासून मृत्‍यूशी झुंज देत होती. रवींद्र प्रेमनाथ बोर्डे (वय ३६), अनुपम प्रेमनाथ बोर्डे (वय ४०), ज्योती रवींद्र बोर्डे (सर्व रा. देवळी, ता. गंगापूर, ह. मु. पोलीस कॉलनी, हर्सूल) अशी संशयितांची नावे आहेत. ज्योती गुन्हा दाखल होताच फरारी झाली आहे, तर रवींद्र व अनुपम यांना न्यायालयाने १० ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मनिषा यांच्या गाऊनमध्ये सुसाइड नोट मिळून आली. त्यात रवींद्र, अनुपम आणि ज्‍योतीने केलेल्या आर्थिक फसवणुकीचा व मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणात मनिषा यांचा सावत्र मुलगा आकाश संजय पांडे (वय २६) यांनी तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकरण...
२०१७ मध्ये अनुपम व रवींद्र हे दोन्ही भाऊ मनिषा यांच्या घरात भाड्याने राहायला आले होते. ते ६ वर्षे राहिले. एप्रिल २०२३ मध्ये रवींद्रने प्रारंभ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली. अध्यक्षपदी अनुपम तर सचिवपदी तो स्वतः होता. या संस्थेतून मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून मनिषा पांडे यांच्याकडून सुरुवातीला १ लाख ४४ हजार रुपये घेतले. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्नाचे कारण करून मनिषा यांच्या नावे २ लाख रुपये कर्ज काढले. हप्ते तो भरेल, असे सुरुवातीला सांगितले, पण परतफेड केली नाही.

पुन्हा नव्या व्यवसायासाठी त्यांच्याकडून ३.५ तोळ्याचे दागिने घेत ८ दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते देखील परत केले नाही. मनिषा यांनी रवींद्र व अनुपमकडे पैसे, दागिने परत मागितले असता त्यांनी मनिषा यांना धमकावत मारहाण केली. यातूनच मनिषा यांनी विष पिले होते. ७ ऑक्टोबरला मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. बेगमपुऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी गुन्हा दाखल करत बहिणीकडे लपून बसलेल्या रवींद्र व अनुपमला अटक केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software