नारेगावमध्ये २५ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगावमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने शुक्रवारी (३ ऑक्‍टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला  आहे.

राखी अजित झा (वय २५, रा. राजेंद्रनगर, नारेगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती अजित आनंद झा (वय ३२), सासरा आनंद, दीर सुमित, चुलत सासरा कन्हैया, राजेश झा, निभा झा, अन्नपूर्णा झा (सर्व रा. राजेंद्रनगर, नारेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राखीचे वडील राजकुमार झा (वय ५२, रा. दिल्ली, मूळ बिहार) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, राखीचा विवाह चार वर्षांपूर्वी अजितसोबत झाला होता. मुलीचा हुंड्यासाठी छळ करण्यात येत असल्याने त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करत आहेत.

गंगापूर तालुक्‍यात विवाहितेची आत्‍महत्‍या
गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे राहत्या घरात गळफास घेऊन जयश्री प्रकाश सरोवर (वय ३२) या महिलेने आत्‍महत्‍या केली. ही घटना रविवारी (५ ऑक्‍टोबर) दुपारी चारच्या सुमारास समोर आली. घरातील लहान मुलांनी आईला फासावर लटकलेले पाहिल्यानंतर आरडाओरड केली. यानंतर शेजारी धावून आले. जयश्री यांना लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software