हॉटेल-दुकानदारांनी कायदा-सुव्यवस्था बसवली धाब्‍यावर; रात्री ११ नंतरही व्यवसाय सुरू ठेवण्याचा हेका, वरून पोलिसांवर दमदाटीचा आरोप!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे, त्‍यात सण-उत्‍सवाचे वातावरण असल्याने पोलीस प्रशासनावर कर्तव्य बजावताना प्रचंड ताण येत आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्‍न करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी काही व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक रात्री ११ नंतरही दुकाने, हॉटेल बिनदिक्कत सुरू ठेवत आहेत. त्‍यांना दुकाने, हॉटेल बंद करायला सांगायला गेलेल्या पोलिसांवर दमदाटीचा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे, त्‍यात सण-उत्‍सवाचे वातावरण असल्याने पोलीस प्रशासनावर कर्तव्य बजावताना प्रचंड ताण येत आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्‍न करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी काही व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक रात्री ११ नंतरही दुकाने, हॉटेल बिनदिक्कत सुरू ठेवत आहेत. त्‍यांना दुकाने, हॉटेल बंद करायला सांगायला गेलेल्या पोलिसांवर दमदाटीचा आरोप करत आहेत. विशेष म्‍हणजे, पोलीस आयुक्‍तांनी केवळ दिवाळी सणाशी निगडीत व्यापाऱ्यांनाच दुकाने १२ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र त्‍याचा ‘लाभ’ अन्य व्यापारी, हॉटेल व्यावसायिकही उचलत आहेत.

शहर संवेदनशील असून गेल्या काही दिवसांत नशेखोरांचे कारनामे आणि एकूणच वाढलेल्या गुन्हेगारीमुळे निवडणुकीत आणि सण-उत्‍सवात कोणत्‍या चुकीच्या घटना घडू नये यासाठी शहर पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. यापूर्वीच पोलिसांनी रात्री ११ लाच बाजारपेठ बंद करण्याचे आदेश पारित केले आहेत. मात्र आता सण-उत्‍सवात बाजारपेठेत गर्दी होत असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी मध्यरात्रीपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी पोलीस आयुक्‍तांकडे मागितली होती. व्यापाऱ्यांच्या भावना समजून घेत पोलीस आयुक्‍तांनी दिवाळी सणाशी निगडीत व्यापाऱ्यांना तशी परवानगी दिलीही आहे.

मात्र त्‍यांना परवानगी आणि आम्‍हाला का नाही, असा हेका बाकीच्या व्यापारी आणि हॉटेल व्यावसयिकांनी धरला आहे. मध्यरात्रीपर्यंत सर्वच बाजारपेठ सुरू राहिली तर तोपर्यंत नागरिक खरेदीसाठी गर्दी करतील आणि तिथून पुढे घरी जाण्यासाठी निघतील तेव्हा त्‍यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न कायम आहे. त्‍यामुळे वेळीच बाजारपेठ बंद करणे हाच पर्याय आहे. व्यवसायाचा हट्ट करून शहराच्या कायदा-सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे सध्या सुरू आहे. खरेदी केल्यानंतर अनेक नागरिक हॉटेल्समध्ये जेवायला जात असल्याने हॉटेल्सही मध्यरात्र उलटली तरी चालूच राहत असल्याचे चित्र आहे. त्‍यामुळे पोलीस हॉटेल्स बंद करायला येतात तेव्हा हॉटेल्सचालकांकडून पोलिसांनाच वरिष्ठांकडे तक्रार करण्याची दमदाटी करत असल्याचे चित्र आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software