मिलिंदनगरात आचाऱ्याची आत्‍महत्‍या, आ. नारायण कुचेंनी धमकावल्याचा सुसाईड नोटमध्ये आरोप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उस्मानपुऱ्यातील मिलिंदनगरात आचारी जगदीश खेमचंद सुरभैय्ये (वय ४६) यांनी राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी समोर आली. केटरिंगचे काम नसल्यास जगदीश भाजी, फळे विकत होते. तीन मुली, मुलगा, पत्नी, आईसह ते राहत होते. कुटुंबातील सदस्य कामात असताना त्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन गळफास घेतला. कुटुंबीयांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उस्मानपुऱ्यातील मिलिंदनगरात आचारी जगदीश खेमचंद सुरभैय्ये (वय ४६) यांनी राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी समोर आली. केटरिंगचे काम नसल्यास जगदीश भाजी, फळे विकत होते.

तीन मुली, मुलगा, पत्नी, आईसह ते राहत होते. कुटुंबातील सदस्य कामात असताना त्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्यांना घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कर्ज फेडूनही काही लोक देत असलेल्या त्रासामुळे त्‍यांनी आत्‍महत्‍या केल्याचे समोर येत आहे.

सुसाईड नोटमध्ये आ. कुचेंवर आरोप…
ओम नमः शिवाय, मी जगदीश सुरभय्ये. मी जय भवानी बँकेकडून २०१९ मध्ये २ लाख रुपये कर्ज घेतले होते, पण मी संपूर्ण व्याज भरले आहे. तरीही आमदार नारायण कुचे व त्यांचा भाऊ देविदास कुचे मला धमक्या देत आहेत म्हणून मी आत्महत्या करीत आहे, अशी सुसाईड नोट जगदीश सुरभैय्ये यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. उस्मानपुरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

गुन्हा दाखल करण्याची आ. सांबरे यांची मागणी
या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी बदनापूरचे माजी आ. संतोष सांबरे यांनी केली आहे. त्यांनी ७ ऑगस्टला पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

आ. कुचे यांचे स्पष्टीकरण…
मी या व्यक्तीला आयुष्यात कधीही बोललेलो नाही. त्यांच्या कधीही संपर्कात आलेलो नाही. माझा त्यांच्याशी कोणताही व्यावहारिक संबंध नाही. ही चिठ्ठी दुसऱ्याच माणसाने त्यांच्याकडे दिली असावी, अशी शक्यता आहे. राजकीय सूड भावनेतून आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. याची पोलिसांनी कसून चौकशी करावी. त्यानंतरच सत्यता समोर येईल, असे स्‍पष्टीकरण आ. नारायण कुचे यांची दिले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software