एका लग्नाची कहानी… लग्न होताच नवरा-नवरीला मंडप सोडून पळावे लागले…!, चिकलठाण्यात असं काय घडलं…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शुभमंगल सावधान…म्हणत वऱ्हाडींनी अक्षता नवरा-नवरीच्या डोक्‍यावर टाकल्या, वाजंत्री मंडळीही सावधान झाली… सनई-चौघडे वाजू लागले…फटाके फुटले… लग्न कोणत्याही विघ्नाविना पार पडले…कारण विघ्न थोडं लेट झालं… पाहुणमंडळी जेवणासाठी धावली… पहिली पंगत बसली… अन्‌ दामिनी पथकाची एंट्री झाली… मुलगी अल्पवयीन होती, त्‍यामुळे हा बालविवाह ठरत होता, पोलिसांना पाहून नातेवाइकांनी त्‍यांच्याकडे येत ती कायद्याने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शुभमंगल सावधान…म्हणत वऱ्हाडींनी अक्षता नवरा-नवरीच्या डोक्‍यावर टाकल्या, वाजंत्री मंडळीही सावधान झाली… सनई-चौघडे वाजू लागले…फटाके फुटले… लग्न कोणत्याही विघ्नाविना पार पडले…कारण विघ्न थोडं लेट झालं… पाहुणमंडळी जेवणासाठी धावली… पहिली पंगत बसली… अन्‌ दामिनी पथकाची एंट्री झाली… मुलगी अल्पवयीन होती, त्‍यामुळे हा बालविवाह ठरत होता, पोलिसांना पाहून नातेवाइकांनी त्‍यांच्याकडे येत ती कायद्याने सज्ञान असल्याचे दावे केले. खोटे आधारकार्डही दाखवले, पण टीसीची मागणी करताच बिंग फुटले… कुणीतरी मग नवरा-नवरीला दुचाकीवरून पळवून लावले… अशा तऱ्हेने एका लग्नाची ही कहानी जरा जास्तच रोमांचक झाली… गुरुवारी (१७ ऑक्‍टोबर) सायंकाळी सहाला चिकलठाण्यातील ठाकूर मंगल कार्यालयात हा प्रकार घडला.

दामिनी पथकप्रमुख कांचन मिरधे यांना चिकलठाण्यात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सायंकाळी पाचला त्‍यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी आम्रपाली बोर्डे, नितेश दुर्वे, पोलीस अंमलदार कल्पना खरात, सुधाकर पवार, सोनाली निकम, मनीषा बनसोडे यांच्यासह ठाकूर मंगल कार्यालयात धाव घेतली. मात्र त्‍यांना येण्यास उशीर झाला. बालविवाह आधीच पार पडलेला होता. पाहुणे पहिल्या पंगतीला बसले होते. नवदाम्पत्याचे आनंदात फोटोसेशनही सुरू होते. पोलीस आल्याचे पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. पोलिसांकडे नातेवाइक धावले. पोलिसांनी त्‍यांच्याकडे मुला- मुलीच्या आधार कार्डची मागणी केली. पालकांनी मुलीचे १२ मार्च २००५ जन्मतारीख असलेले आधार कार्ड दाखवले.

मात्र हे आधारकार्ड बनावट असल्याचा संशय बालविकास अधिकाऱ्यांना आला. त्यांनी मुलीच्या टीसीची मागणी केली. इथेच बिंग फुटले. पोलिसांच्या एकूण पवित्र्यामुळे नातेवाइकांनी गोंधळ सुरू केला. त्यांनी पोलीस व बालविकास अधिकाऱ्यांना चोहूबाजूंनी घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्ती केली. पोलीस त्यांना समजावून सांगत होते. या गोंधळाची संधी साधून काहींनी नवरा-नवरीला मंगल कार्यालयाबाहेर नेऊन दुचाकीवरून पळवून लावले. वाढता गोंधळ पाहून दामिनी पथकाने अधिकचा बंदोबस्त मागवला. पण तोपर्यंत नवरा-नवरी गायब झाले होते. आता या विवाहाची सखोल चौकशी होणार आहे. खरंच नवरी अल्पवयीन असेल तर लग्न जुळवणाऱ्यांपासून नवरा-नवरीच्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल होतील.

जुना बाजारात बालविवाह रोखला…
चिकलठाण्यातील बालविवाह रोखण्याचे प्रयत्न अपयशी ठरले तरी जुना बाजारात मात्र दामिनी पथकाला यश आले. एका १७ वर्षीय मुलीचे गरिबीचे कारण देत २२ वर्षीय मुलासोबत लग्न लावले जात होते. दामिनी पथकाने यावेळी मात्र वेळेवर जाऊन लग्न थांबवले. एका छोट्या हॉलमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. पथकाने पालकांची समजूत काढून सर्वांना सोमवारी (२१ ऑक्‍टोबर) बाल कल्याण समितीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software